महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळणार; मंत्री आदिती तटकरे

संभाजीनगर: राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केलं आहे की, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कार्यवाही सुरू केली आहे.

अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आधारस्तंभ ठरल्या आहेत. त्या महिलांच्या आणि बालकांच्या पोषण, शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षं सेवेत आहेत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या भविष्यासाठी काहीच हमी नव्हती. आता सरकारने पेन्शन व ग्रॅज्युइटीचा प्रस्ताव पुढे नेल्यामुळे त्यांचं भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे.

या निर्णयामागील पार्श्वभूमी

राज्यात सुमारे २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत

मार्च २०२५ व एप्रिल २०२५ चे मानधन रखडल्यामुळे सेविकांनी एप्रिलमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार मोर्चा काढला

या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास विभागाने पेन्शन व ग्रॅज्युइटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला

सेविकांचे मानधन केंद्र, राज्य व अतिरिक्त राज्य निधीतून अदा केलं जातं

मार्चचे मानधन २५ एप्रिलला आणि एप्रिलचे मानधन ६ मेला अदा करण्यात आले

मंत्री आदिती तटकरे यांचे विधान

“अंगणवाडी सेविकांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्यासाठी प्रस्ताव कार्यवाहीत असून, नियमित मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे.”

या निर्णयाचे थेट फायदे

सेविकांना सेवानिवृत्तीनंतरही आर्थिक सुरक्षा

शासनाची किमान वेतन लागू करण्याची तयारी

प्रलंबित मागण्यांना मिळत आहे न्याय

सेविकांच्या कष्टांना मिळतोय सन्मान व सन्मानाने निवृत्ती

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

55 मिनिटे ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

3 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago