मुंबई: सांगली जिल्ह्यातील पालूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
ही मदत भारती विद्यापीठाच्या स्व. डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी तर्फे देण्यात आली आहे.यावेळी डॉ. कदम म्हणाले, “शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि त्यांच्या संकटकाळात आपण त्यांच्यासोबत राहिले पाहिजे, हा विचार माझे वडील स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी नेहमी जपला. त्या परंपरेला पुढे नेत आम्ही ही मदत दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना नव्याने उभे राहण्यासाठी बळ देण्यासाठी भारती परिवार सदैव तत्पर राहिला आहे.”या भेटीत राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विस्तृत चर्चा झाली.यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी आणि कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप उपस्थित होत्या.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…
सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…
मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…
शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…