महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन

मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी घाटकोपर येथे ३०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे केंद्र केवळ स्मारक नसून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश जगभर पोहोचवणारे हे केंद्र ‘जागतिक ज्ञानपीठ’ ठरेल. या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकल्पामध्ये २० मीटर उंचीचा अण्णाभाऊ साठे यांचा कांस्य पुतळा, ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प, आधुनिक ग्रंथालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, UPSC-MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन आणि मुलांसाठी डिस्कव्हरी झोन उभारण्यात येणार आहेत.

अण्णाभाऊ साठे हे शोषित, वंचित, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी समाजाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्या साहित्य आणि विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा वारसा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य व चळवळीतून पुढे नेल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देताना २४१ पात्र कुटुंबांचे सन्मानाने पुनर्वसन करण्यात येत असून कोणत्याही कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे ५० कोटी रुपयांच्या निधीतून भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, संजय शिरसाट, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार, आमदार आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

48 मिनिटे ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

55 मिनिटे ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

58 मिनिटे ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

4 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

5 तास ago

राज्यातील शाळांवर FDAचा कडक फूड सेफ्टी ‘वॉच’; जंक फूडला 50 मीटर परिसरात बंदी

तुकाराम मुंढेंची 'सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र' मोहीम; FSSAI परवाना सक्तीचा, वर्षातून दोनदा…

5 तास ago