मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. या घटनेचा निषेध करत मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळत भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी विचारसरणीचा निषेध केला.
यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जातीय भेदभावाच्या मानसिकतेविरोधात संताप व्यक्त केला. ‘खर्गेंचा अपमान म्हणजे दलित, वंचित समाजाचा अपमान’ अशी भूमिका घेत युवक काँग्रेसने सामाजिक समतेच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधला.
झीनत शबरीन म्हणाल्या, “मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे.”भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“भारतीय संविधानाने समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जातीय भेदभाव आणि मनुवादी विचारसरणीला स्थान नाही. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक समतेसाठी युवा काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,” असा निर्धार शबरीन यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात मुंबई युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसैन शेख, महासचिव आसिफ खान, संतोष गुप्ता, ईशान्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा ढवळे, उत्तर मुंबई युवा काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, उत्तर-पश्चिम मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शिव यादव, कार्यकारी अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रदेश, जिल्हा आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…