महाराष्ट्र

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर एक कलाकार दिसतो, पण खरी पटकथा कुणी लिहिली आहे, हे रसिकांना कळत नाही. आणि या नाटकाचा खरा दिग्दर्शक कोण असेल, तर तो म्हणजे विनोद तावडे!

राजकारणात अनेक जण “मी, मी” करत फिरतात, पण काही जण “काम, काम” करत इतिहास घडवतात. तावडे हे दुसऱ्या प्रकारातले. महाराष्ट्रातून गेलेले हे शांत, संयमी, पण आतून पोलादी मनाचे नेते, बिहारसारख्या गुंतागुंतीच्या राजकारणात जाऊन बसले आणि तिथे त्यांनी अक्षरशः राजकीय गणिताची नवी वहीच उघडली.

बिहार म्हणजे काय? जात, समीकरणं, आणि सत्तेचे सतत बदलणारे आकडे! इथे सरळ रेषेत चालणारा माणूस राजकारणात टिकत नाही. पण तावडे यांनी वक्ररेषेलाच सरळ करून दाखवली. सप्टेंबर २०२२ ला प्रभारी म्हणून गेले तेव्हा भाजप सत्तेबाहेर. पण दोन वर्षांत अशी जादू केली की नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून पुन्हा भाजपचा हात धरला. ही केवळ राजकीय ‘घरवापसी’ नव्हती, तर पडद्यामागून खेळलेली बुद्धिबळाची चाल होती!

आता पुढचा अंक – मुख्यमंत्रीपद!

बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री? हे ऐकूनच अनेक जुन्या राजकीय पंडितांनी चष्मे पुसले असतील! पण सम्राट चौधरी यांच्या शपथविधीने ते स्वप्न वास्तवात उतरले.

हे कसं घडलं?

तर हे “एक ना धड, भाराभर चिंध्या” धोरण नव्हतं. हे होतं “एक लक्ष्य, अचूक वार” धोरण!

२०२५ च्या निवडणुकीत तावडे यांनी बूथ लेव्हलपासून आखलेली रणनीती म्हणजे जणू एखाद्या सैन्याचा शिस्तबद्ध मार्च! प्रत्येक कार्यकर्ता सज्ज, प्रत्येक मतदाराशी संवाद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — “जातीच्या पलीकडे विकास” हा मंत्र!

बिहारसारख्या राज्यात जात हा धर्म असतो. पण तावडे यांनी त्या धर्मालाच विकासाची ‘प्रवचनं’ दिली. आणि काय आश्चर्य! मतदारांनी ती ऐकलीही!

दरम्यान, प्रशांत किशोर यांचा ‘जन सुराज्य’ हा वेगाने वाढणारा प्रयोग होता. पण तावडे यांनी त्याचा फुगा असा फोडला की आवाजही बाहेर आला नाही.

हे सगळं पाहिल्यावर लोक म्हणू लागले — “हा माणूस साधा नेता नाही, हा तर बिहारचा ‘चाणक्य’ आहे!”

पण खरी गंमत इथेच आहे!

भाजपमध्ये श्रेय घेण्याची पद्धत नाही. इथे “मी केलं” म्हणणाऱ्यापेक्षा “आपण केलं” म्हणणाऱ्यालाच मान मिळतो. त्यामुळे तावडे यांच्यासारखे अनेक शिल्पकार पडद्यामागेच राहतात.

“हा माणूस इतका शांत आहे की त्याच्या शांततेतच राजकीय वादळं तयार होतात!”

आजच्या राजकारणात ‘तोंडावर बोलणारे’ खूप आहेत, पण ‘काम करून दाखवणारे’ कमी. तावडे यांनी सिद्ध केलं की, गाजावाजा न करता सुद्धा इतिहास लिहिता येतो.

बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवणारा हा दिग्दर्शक, पुढे कोणता अंक रंगवणार?

कारण रंगमंच तयार आहे

कलाकार सज्ज आहेत

आणि प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा त्या पडद्यामागच्या ‘चाणक्या’कडेच लागल्या आहेत!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

6 तास ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

10 तास ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

14 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

1 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

1 दिवस ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

1 दिवस ago