महाराष्ट्र

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर एक कलाकार दिसतो, पण खरी पटकथा कुणी लिहिली आहे, हे रसिकांना कळत नाही. आणि या नाटकाचा खरा दिग्दर्शक कोण असेल, तर तो म्हणजे विनोद तावडे!

राजकारणात अनेक जण “मी, मी” करत फिरतात, पण काही जण “काम, काम” करत इतिहास घडवतात. तावडे हे दुसऱ्या प्रकारातले. महाराष्ट्रातून गेलेले हे शांत, संयमी, पण आतून पोलादी मनाचे नेते, बिहारसारख्या गुंतागुंतीच्या राजकारणात जाऊन बसले आणि तिथे त्यांनी अक्षरशः राजकीय गणिताची नवी वहीच उघडली.

बिहार म्हणजे काय? जात, समीकरणं, आणि सत्तेचे सतत बदलणारे आकडे! इथे सरळ रेषेत चालणारा माणूस राजकारणात टिकत नाही. पण तावडे यांनी वक्ररेषेलाच सरळ करून दाखवली. सप्टेंबर २०२२ ला प्रभारी म्हणून गेले तेव्हा भाजप सत्तेबाहेर. पण दोन वर्षांत अशी जादू केली की नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून पुन्हा भाजपचा हात धरला. ही केवळ राजकीय ‘घरवापसी’ नव्हती, तर पडद्यामागून खेळलेली बुद्धिबळाची चाल होती!

आता पुढचा अंक – मुख्यमंत्रीपद!

बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री? हे ऐकूनच अनेक जुन्या राजकीय पंडितांनी चष्मे पुसले असतील! पण सम्राट चौधरी यांच्या शपथविधीने ते स्वप्न वास्तवात उतरले.

हे कसं घडलं?

तर हे “एक ना धड, भाराभर चिंध्या” धोरण नव्हतं. हे होतं “एक लक्ष्य, अचूक वार” धोरण!

२०२५ च्या निवडणुकीत तावडे यांनी बूथ लेव्हलपासून आखलेली रणनीती म्हणजे जणू एखाद्या सैन्याचा शिस्तबद्ध मार्च! प्रत्येक कार्यकर्ता सज्ज, प्रत्येक मतदाराशी संवाद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — “जातीच्या पलीकडे विकास” हा मंत्र!

बिहारसारख्या राज्यात जात हा धर्म असतो. पण तावडे यांनी त्या धर्मालाच विकासाची ‘प्रवचनं’ दिली. आणि काय आश्चर्य! मतदारांनी ती ऐकलीही!

दरम्यान, प्रशांत किशोर यांचा ‘जन सुराज्य’ हा वेगाने वाढणारा प्रयोग होता. पण तावडे यांनी त्याचा फुगा असा फोडला की आवाजही बाहेर आला नाही.

हे सगळं पाहिल्यावर लोक म्हणू लागले — “हा माणूस साधा नेता नाही, हा तर बिहारचा ‘चाणक्य’ आहे!”

पण खरी गंमत इथेच आहे!

भाजपमध्ये श्रेय घेण्याची पद्धत नाही. इथे “मी केलं” म्हणणाऱ्यापेक्षा “आपण केलं” म्हणणाऱ्यालाच मान मिळतो. त्यामुळे तावडे यांच्यासारखे अनेक शिल्पकार पडद्यामागेच राहतात.

“हा माणूस इतका शांत आहे की त्याच्या शांततेतच राजकीय वादळं तयार होतात!”

आजच्या राजकारणात ‘तोंडावर बोलणारे’ खूप आहेत, पण ‘काम करून दाखवणारे’ कमी. तावडे यांनी सिद्ध केलं की, गाजावाजा न करता सुद्धा इतिहास लिहिता येतो.

बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवणारा हा दिग्दर्शक, पुढे कोणता अंक रंगवणार?

कारण रंगमंच तयार आहे

कलाकार सज्ज आहेत

आणि प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा त्या पडद्यामागच्या ‘चाणक्या’कडेच लागल्या आहेत!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

15 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

15 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

15 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

16 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

16 तास ago

आशाताईंनी स्वर समाधी घेतली! चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहोत; एकनाथ शिंदे

मुंबई: ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे…

16 तास ago