मुंबई: भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी या प्रथितयश रूग्णालयात सेवा देणा-या डाॅ.अतुल वानखेडे या बोगस ऑर्थोपेडीक पदवीधारक सर्जन डाॅक्टरला वरळी पोलीसांनी अटक करून त्याची रवानगी ऑर्थर कारागृहात केली आहे.
डाॅ अतुल वानखेडे यांच्याकडे २०१० साली भारतातून बंद झालेल्या युनिवर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठाची केईएम रुग्णालयातून २०११ सालची ऑर्थोपिडीक एम एस ही पदवी आहे.वास्तविक पाहता २०१० साली भारतातून बंद झालेल्या तसेच केईएम रुग्णालय पुणे येथे ही पदवीच अस्तित्वात नसताना अशा प्रकारची पदवी दाखवून डाॅ अतुल वानखेडे यांनी मुंबई तील विविध नामांकित रूग्णालयात सेवा दिली असून सध्या ते नानावटी रूग्णालयात सेवा देत आहेत.सदर बोगस पदवी प्रकरणी मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे तसेच कौन्सिल ने त्यांना पदवी धारण करण्यास मनाई केल्याचे अशोक कांबळे यांनी सांगितले.
नानावटी रुग्णालयात मणक्याच्या गॅपवर उपचार करण्यासाठी गेलेल्या अविनाश समींदर या डिलीवरी बाॅयला डाॅ .वानखेडे यांनी चुकीचा सल्ला आणि औषधे दिल्यामुळे त्याचा त्रास आणखीन वाढला आपल्यावर या डाॅक्टरकडून चुकीचे उपचार झाल्याची तक्रार समींदर याने अशोक कांबळे यांच्याकडे करीत न्याय देण्याची विनंती केली असता सबंधित डाॅक्टरविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी डाॅक्टर विरोधातभारतीय न्याय संहिता ( बी एन एस), 2023
316 (2),316,(4),318,234,336 (1),336 (2),336 (3),336 (4)
भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ), 2023
337,338,339,340 (2),351 (2)
नुसार गुन्हे दाखल करीत त्याला अटक करून त्याची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली आहे.पोलीसांनी केलेल्या कारवाईत नानावटी रुग्णालयातून त्यांना अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाल्याचे कांबळे यांनी सांगितले.सदर व्यक्तीने चुकीचा पत्ता वापरून अनेक बेकायदेशीर कागदपत्रे मिळवून दिशाभूल केल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…