मुंबई: भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी या प्रथितयश रूग्णालयात सेवा देणा-या डाॅ.अतुल वानखेडे या बोगस ऑर्थोपेडीक पदवीधारक सर्जन डाॅक्टरला वरळी पोलीसांनी अटक करून त्याची रवानगी ऑर्थर कारागृहात केली आहे.
डाॅ अतुल वानखेडे यांच्याकडे २०१० साली भारतातून बंद झालेल्या युनिवर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठाची केईएम रुग्णालयातून २०११ सालची ऑर्थोपिडीक एम एस ही पदवी आहे.वास्तविक पाहता २०१० साली भारतातून बंद झालेल्या तसेच केईएम रुग्णालय पुणे येथे ही पदवीच अस्तित्वात नसताना अशा प्रकारची पदवी दाखवून डाॅ अतुल वानखेडे यांनी मुंबई तील विविध नामांकित रूग्णालयात सेवा दिली असून सध्या ते नानावटी रूग्णालयात सेवा देत आहेत.सदर बोगस पदवी प्रकरणी मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे तसेच कौन्सिल ने त्यांना पदवी धारण करण्यास मनाई केल्याचे अशोक कांबळे यांनी सांगितले.
नानावटी रुग्णालयात मणक्याच्या गॅपवर उपचार करण्यासाठी गेलेल्या अविनाश समींदर या डिलीवरी बाॅयला डाॅ .वानखेडे यांनी चुकीचा सल्ला आणि औषधे दिल्यामुळे त्याचा त्रास आणखीन वाढला आपल्यावर या डाॅक्टरकडून चुकीचे उपचार झाल्याची तक्रार समींदर याने अशोक कांबळे यांच्याकडे करीत न्याय देण्याची विनंती केली असता सबंधित डाॅक्टरविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी डाॅक्टर विरोधातभारतीय न्याय संहिता ( बी एन एस), 2023
316 (2),316,(4),318,234,336 (1),336 (2),336 (3),336 (4)
भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ), 2023
337,338,339,340 (2),351 (2)
नुसार गुन्हे दाखल करीत त्याला अटक करून त्याची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली आहे.पोलीसांनी केलेल्या कारवाईत नानावटी रुग्णालयातून त्यांना अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाल्याचे कांबळे यांनी सांगितले.सदर व्यक्तीने चुकीचा पत्ता वापरून अनेक बेकायदेशीर कागदपत्रे मिळवून दिशाभूल केल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…