महाराष्ट्र

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा…

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा असून अर्थसंकल्पातून केवळ काल्पनिक परिणामांवर समाधान मानावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला मात्र यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला आहे.

७ लाखांच्या उत्पन्नाला कर नाही हे स्वागतार्ह आहे परंतु देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ०.३ टक्क्यापेक्षा कमी लोकांना याचा फायदा होईल आणि बहुसंख्य लोकं फायद्यांच्या कक्षेबाहेर राहतील असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी असंघटित क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसते असून भाजपच्या मतांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी यावेळी केली.

चालू खात्यातील वित्तीय तूट नियंत्रित न आल्यास विपरीत परिणाम होऊन रुपया कमकुवत होण्याची शक्यता असते आणि नंतर उच्च आयात खर्च आकर्षित करण्यामुळे आपल्या परकीय गंगाजळीचा निचरा होण्याची शक्यता असते, अशी भीती महेश तपासे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते मात्र मोदीसरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने रोजगार निर्मितीत ते अपयशी ठरले आहेत. या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा बेरोजगार तरुणांचा प्रचंड भ्रमनिरास झाला आहे असा जोरदार हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.

येत्या काही महिन्यांत जागतिक मंदीचा भारतावर परिणाम झाला तर ती भारतासाठी चिंतेची गंभीर बाब असणार आहे त्यामुळे सरकारला त्यादृष्टीने रणनीती पुन्हा आखावी लागेल, असेही महेश तपासे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

6 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

16 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

16 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

16 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

16 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

16 तास ago