वैजापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर -शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडलं. परंतु उद्घाटनानंतर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु झाल्याने हा मार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळ एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. आग भडकल्याने कार काही क्षणात जळून खाक झाली. ही कार पुण्यातील नितीन सिंह राजपूत यांची असल्याचे समोर आले.
सविस्तर माहिती अशी की, राजपूत कुटुंब समृद्धी महामार्गावरुन शिर्डी मार्गे पुण्याला जात होते. वैजापूरच्या गलांडे वस्तीजवळ कार येताच गाडीतून धूर निघत असल्याचे राजपूत यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी करुन कार रस्त्याच्या कडेला उभी केली. खाली उतरून गाडीची पाहणी केली असता गाडीच्या समोरील भागात आग लागल्याचे दिसले.
त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडीत बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढेल. अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण गाडीने पेट घेतला. या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. राजपतू यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली असून, जिल्हाध्यक्षांपासून ग्रामपातळीपर्यंत…
ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड…
ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट…
मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…
मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…