संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत.
पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत.
चला जाणून घेऊया काही उत्तम करिअर पर्याय
1) अभियांत्रिकी (Engineering): जर तुम्ही PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) घेतले असेल, तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम वाट आहे.
जेईईसारख्या परीक्षांद्वारे IITs, NITs मध्ये प्रवेश घेता येतो.
काही नवे पर्याय
आर्टिफिशियल इंटेलिजेंस
डेटा सायन्स
सायबर सिक्युरिटी
रोबोटिक्स
एरोस्पेस इंजिनिअरिंग
2) फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी
आरोग्यसेवा आणि संशोधन क्षेत्रात करिअर करायचं असेल तर B.Pharm किंवा B.Sc Biotechnology हे उत्तम पर्याय आहेत. औषध कंपन्या, R\&D लॅब, हॉस्पिटल्स याठिकाणी भरपूर संधी आहेत.
3) वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान NEET दिल्यानंतर खालील अभ्यासक्रम करता येतात
MBBS
BDS
BAMS
BHMS
BPT
याशिवाय पॅरामेडिकल कोर्सेस
लॅब टेक्नॉलॉजी
रेडिओलॉजी
फिजिओथेरपी
नर्सिंग इत्यादी
4) डेटा सायन्स आणि आई
आजच्या डिजिटल युगात डेटा म्हणजे सोनं आहे. जर तुमचं संगणक व गणितात विशेष लक्ष असेल, तर Machine Learning, Data Science, AI क्षेत्र तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संधी देऊ शकते.
5) कमर्शियल पायलट आणि एव्हिएशन उंच भरारी मारायचीय का
तर पायलट व्हा. DGCA मान्यताप्राप्त कोर्स करून कमर्शियल पायलट बनू शकता. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ, फ्लाइट ऑपरेशन्स अशा क्षेत्रांतही करिअर करता येते.
6) पर्यावरण विज्ञान आणि हवामान अभ्यास
शाश्वत विकासासाठी पर्यावरण शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञांची गरज वाढत आहे.
जर तुम्हाला निसर्ग आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी काहीतरी करायचं असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे.
महत्वाचे
बारावी नंतर योग्य करिअर पर्याय निवडणं ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी पायरी असते.
स्वतःचे आवडते विषय, कौशल्यं आणि ध्येय लक्षात घेऊन निर्णय घ्या.
गरज असल्यास शिक्षक, पालक किंवा करिअर काउन्सिलरचा सल्ला जरूर घ्या
मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…
मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…
अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…