महाराष्ट्र

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत.

पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत.

चला जाणून घेऊया काही उत्तम करिअर पर्याय

1) अभियांत्रिकी (Engineering): जर तुम्ही PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) घेतले असेल, तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम वाट आहे.

जेईईसारख्या परीक्षांद्वारे IITs, NITs मध्ये प्रवेश घेता येतो.

काही नवे पर्याय

आर्टिफिशियल इंटेलिजेंस

डेटा सायन्स

सायबर सिक्युरिटी

रोबोटिक्स

एरोस्पेस इंजिनिअरिंग

2) फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी

आरोग्यसेवा आणि संशोधन क्षेत्रात करिअर करायचं असेल तर B.Pharm किंवा B.Sc Biotechnology हे उत्तम पर्याय आहेत. औषध कंपन्या, R\&D लॅब, हॉस्पिटल्स याठिकाणी भरपूर संधी आहेत.

3) वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान NEET दिल्यानंतर खालील अभ्यासक्रम करता येतात

MBBS

BDS

BAMS

BHMS

BPT

याशिवाय पॅरामेडिकल कोर्सेस

लॅब टेक्नॉलॉजी

रेडिओलॉजी

फिजिओथेरपी

नर्सिंग इत्यादी

4) डेटा सायन्स आणि आई

आजच्या डिजिटल युगात डेटा म्हणजे सोनं आहे. जर तुमचं संगणक व गणितात विशेष लक्ष असेल, तर Machine Learning, Data Science, AI क्षेत्र तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संधी देऊ शकते.

5) कमर्शियल पायलट आणि एव्हिएशन उंच भरारी मारायचीय का

तर पायलट व्हा. DGCA मान्यताप्राप्त कोर्स करून कमर्शियल पायलट बनू शकता. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ, फ्लाइट ऑपरेशन्स अशा क्षेत्रांतही करिअर करता येते.

6) पर्यावरण विज्ञान आणि हवामान अभ्यास

शाश्वत विकासासाठी पर्यावरण शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञांची गरज वाढत आहे.

जर तुम्हाला निसर्ग आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी काहीतरी करायचं असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे.

महत्वाचे

बारावी नंतर योग्य करिअर पर्याय निवडणं ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी पायरी असते.

स्वतःचे आवडते विषय, कौशल्यं आणि ध्येय लक्षात घेऊन निर्णय घ्या.

गरज असल्यास शिक्षक, पालक किंवा करिअर काउन्सिलरचा सल्ला जरूर घ्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

21 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

21 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

1 दिवस ago