मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे.
सपकाळ यांनी आरोप केला की, धिरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून, त्या वेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्वांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या विचारांवर संविधानाची पायाभरणी झालेली आहे. मात्र, काही लोकांकडून त्यांच्या इतिहासाची “विकृत मांडणी” केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांनी असा दावाही केला की, काही भाजप नेते व विचारवंतांकडून पूर्वीही शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने झाली आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भाबाबतही सपकाळ यांनी भूमिका मांडत, दोघांचा कालखंड वेगळा असल्याचा दावा करत इतिहासाची तोडफोड होत असल्याचे म्हटले.दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात प्रतिक्रिया उमटत असून, शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…