मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. सुभाष चव्हाण यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपला आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की, सुभाष चव्हाण यांनी काँग्रेसचा विचार रुजवण्याचे महत्वाचे काम केले. प्रदेश काँग्रेसचे सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष व विधान परिषद सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम केले. पक्षाने त्यांना दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सुभाष चव्हाण यांचा जन्म सिंधुदुर्ग, तालुका मालवण मधील धामापूर या गावचा.
धामापूर गावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठवान कार्यकर्ता गमावला आहे. सुभाष चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक,…
लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…
मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…
सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…