मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. सुभाष चव्हाण यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपला आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की, सुभाष चव्हाण यांनी काँग्रेसचा विचार रुजवण्याचे महत्वाचे काम केले. प्रदेश काँग्रेसचे सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष व विधान परिषद सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम केले. पक्षाने त्यांना दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सुभाष चव्हाण यांचा जन्म सिंधुदुर्ग, तालुका मालवण मधील धामापूर या गावचा.
धामापूर गावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठवान कार्यकर्ता गमावला आहे. सुभाष चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…