महाराष्ट्र

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेला गती; राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’च्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली.

‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधील भौतिक तसेच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना समतोल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

यापूर्वी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांची निवड करण्यात आली होती. त्या शाळांमधील विकासकामे अंतिम टप्प्यात असून आता नव्याने ४०५ शाळांचा समावेश करण्यात आल्याने योजनेचा विस्तार अधिक वेगाने होणार आहे.

या योजनेत समूह साधन केंद्र शाळा, पीएमश्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत अखंड व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक शाळेसाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

योजनेअंतर्गत शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, आरओ किंवा यूव्ही फिल्टर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. तसेच विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ची सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शाळा ‘क्रीडा प्रबोधिनी’ म्हणून विकसित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत जिल्हानिहाय वितरित केला जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

5 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

5 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

6 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

6 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

6 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

6 तास ago