महाराष्ट्र

१.१४ लाख कोटींच्या ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ करारामागे डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा; उदय सामंत

एमएमआरमध्ये उभारला जाणार ५०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीन एआय डेटा सेंटर पार्क; ३ हजारांपर्यंत रोजगारनिर्मितीची शक्यता

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत करण्यात आलेला १.१४ लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार हा शिवसेना खासदार Dr. Shrikant Shinde यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश असल्याचे उद्योगमंत्री Uday Samant यांनी म्हटले आहे.

उद्योगमंत्री सामंत यांनी एक्सवरील पोस्टद्वारे खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले. उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निमंत्रणावरून एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाने तब्बल १२ अब्ज डॉलर्स अर्थात १.१४ लाख कोटी रुपयांचा करार केला. मुंबई आणि नवी दिल्ली येथे झालेल्या सातत्यपूर्ण बैठका व समन्वयातून हा करार साकार झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

या प्रकल्पाअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि आधुनिक डेटा सेंटर पार्क उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प २४ तास नवीकरणीय ऊर्जेवर चालणारा देशातील अग्रगण्य उपक्रम ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या गुंतवणुकीमुळे सुमारे २ हजार ते ३ हजार उच्च-तंत्रज्ञान आधारित रोजगार निर्माण होणार असून महाराष्ट्राला देशाची ‘डिजिटल आणि एआय राजधानी’ बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

2 तास ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

2 तास ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

16 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

16 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

16 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

16 तास ago