महाराष्ट्र

आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश! राष्ट्रवादीशी चर्चा करूनच निर्णय; उदय सामंत

मुंबई: माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच करण्यात आला असून, यामुळे महायुतीत कोणताही वाद निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, महायुतीतील सर्व मित्र पक्षांनी युती धर्माचे पालन करावे, यावर सामंजस्य आहे. एखादा पदाधिकारी पक्ष सोडत असेल तर तो महायुतीतच राहावा, ही आमची जबाबदारी आहे. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते.

मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. “परांजपे यांचा डीएनए शिवसेनेचाच असल्याने ते स्वगृही परतले,” असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे सांगताना सामंत म्हणाले की, पक्षप्रवेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे सचिव जय पवार यांच्याशी चर्चा करून त्यांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. परस्पर चर्चेनंतरच हा पक्षप्रवेश झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सामंत यांनी सांगितले की, आनंद परांजपे यांनीही कुठेही राष्ट्रवादी नेतृत्वावर नाराजी किंवा टीका केलेली नाही. त्यामुळे या प्रवेशामुळे महायुतीत मतभेद असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले.

इंधन बचतीसाठी ईव्ही वाहनांच्या वापरावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना खर्चात बचत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्योग विभागात ईव्ही वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव पोलिसांची संवेदशीलता; जबरी चोरीनंतर अपघाती मृत्यू झालेल्या महिलेला दिला न्याय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव परिसरात भंगार गोळा करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवत…

2 तास ago

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अहिरांच्या हाती विधान परिषदेच्या उपसभापती पदाची धुरा

'पक्षापेक्षा नियम मोठे, भावनेपेक्षा परंपरा मोठी'; उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देण्याचा विश्वास मुंबई: राज्य…

4 तास ago

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

8 तास ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

8 तास ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

8 तास ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

8 तास ago