महाराष्ट्र

अखेर एकमताने नेपाळच्या नवीन पंतप्रधानाच नाव ठरलं

नेपाळ: भारताच्या शेजारचा छोटासा देश नेपाळ मागच्या तीन दिवसांपासून हिंसाचारामध्ये होरपळत आहे. सोशल मिडिया बॅनवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. अवघ्या दोन दिवसात के.पी. शर्मा ओली यांचं सरकार कोसळलं.

जेन-Z समर्थकांनी केलेल्या आंदोलनात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. नेते, मंत्र्‍यांना पळवून पळवून मारण्यात आलं. हा राग आणि चिडीमागे मुख्य कारण होतं, नेपाळमधला भ्रष्टाचार आणि बेरोजगारी. नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवीन पंतप्रधान कोण बनणार? यावर विविध तर्क-वितर्क सुरु होते. अखेर आता एका नावावर शिक्कामोर्तब झालय. नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. राष्ट्रपती रामचन्द्र पौडेल त्यांना शपथ देतील. जेन-Z समर्थकांमध्ये त्यांच्या नावावर एकमत झालं.काठमांडूचे महापौर आणि PM पदाचे प्रबळ दावेदार बालेन शाह यांनी सुद्धा कार्की यांचं समर्थन केलय. अंतरिम पंतप्रधानपदासाठी कुलमान घिसिंग यांचं नाव सुद्धा शर्यतीत होतं. घिसिंग यांनी नेपाळ वीज बोर्डात काम केलय.

सुशीला कार्की हा मागच्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये सरकार विरोधी चेहरा राहिला आहे. मुख्य न्यायाधीश पदावर असताना त्यांनी नेपाळ सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात अनेक निर्णय घेतले होते. या आपल्या निर्णयांमुळे त्या नेपाळच्या Gen Z मध्ये लोकप्रिय बनल्या. 73 वर्षांच्या सुशीला या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत. त्यांचा जन्म 7 जून 1952 रोजी नेपाळच्या बिराटनगरमध्ये झाला. 11 जुलै 2016 रोजी त्या नेपाळ सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस बनल्या. कार्की या पदावर जवळपास 1 वर्ष होत्या. त्यानंतर 30 एप्रिल 2017 रोजी त्यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला. त्यानंतर त्यांना चीफ जस्टिस पदावरुन सस्पेंड करण्यात आलं.

भारतात कुठे घेतलं शिक्षण

1972 साली त्यांनी महेंद्र मोरांग कॅम्पस बिराटनगरमधून BA केलं. त्यानंतर 1975 साली भारताच्या बनारस हिंदू यूनिवर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समधून मास्टर्स केलं. त्यानंतर 1978 साली नेपाळच्या त्रिभुवन यूनिवर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली.त्यानंतर त्यांनी लॉ ची प्रॅक्टिस सुरु केली.

भारताबद्दल त्यांचं काय मत

सुशीला कार्की या भारत-नेपाळ संबंधांबद्दल सकारात्मक आहेत.त्या इंटरव्यूमध्ये म्हणालेल्या की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करते. PM मोदीबद्दल त्यांचं चांगलं मत आहे. “आम्ही अनेक दिवसांपासून भारताच्या संपर्कात नाही आहोत. आम्ही या बद्दल बोलू. जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय विषय असतो, दोन देशांमधलं प्रकरण असतं. तेव्हा काही लोक बसून निती बनवतात” असं सुशीला कार्की म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

14 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

15 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

19 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago