गडचिरोलीतील पाच रुग्णवाहिका दोन वर्षांपासून बंद; गैरव्यवहाराची चौकशी करा; विजय वडेट्टीवार

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित गंभीर बाब औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

गडचिरोली जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अखत्यारीतील पाच रुग्णवाहिका सर्व्हिसिंगसाठी चंद्रपूर येथील शोरूममध्ये देण्यात आल्या होत्या. यापैकी दोन रुग्णवाहिका सहा महिन्यांपूर्वी, तर तीन रुग्णवाहिका तब्बल दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप त्या दुरुस्त होऊन परत मिळालेल्या नसल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

दुरुस्तीसाठी गेलेल्या रुग्णवाहिकांचे इंजिन, गिअरबॉक्ससह अन्य महत्त्वाचे सुटे भाग गायब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. हे साहित्य कसे गायब झाले, यामागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णवाहिकांच्या देखभालीसाठी नियुक्त अभियंत्यांनी संबंधित शोरूमकडे दुरुस्तीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना धमकावण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात आधीच रुग्णवाहिकांची कमतरता असताना पाच रुग्णवाहिका दीर्घकाळ बंद अवस्थेत पडून राहणे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. या प्रकरणात संगनमताने वाहनांचे साहित्य विकण्यात आले का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित रुग्णवाहिका तातडीने कार्यान्वित करण्याचे तसेच एवढा कालावधी उलटूनही त्या दुरुस्त का झाल्या नाहीत, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले.गडचिरोलीतील रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सभागृहात केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामदास आठवले सामाजिक न्यायाची मशाल; एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गंभीर आजारांमुळे २७३ बळी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.…

3 तास ago

पुणेकरांच्या आवडत्या बर्गर किंगसह सयाजी हॉटेल आणि झेप्टोवर FDA ची कारवाई; अन्न परवाने निलंबित

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणांसह ऑनलाईन किराणा वितरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…

3 तास ago

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

12 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

20 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

20 तास ago