महाराष्ट्र

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. कुटुंबाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ न करता शांततेत संवाद साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष तपास समिती स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाशी संवाद साधून सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. “न्याय मिळवून देणे आणि कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी आहे,” असे गोऱ्हे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर पीडितेची ओळख उघड करणारे संदेश प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा असून नागरिकांनी असे संदेश तात्काळ हटवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या घटनेचा जात-धर्माच्या आधारावर गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी तीव्र टीका केली.

महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी राज्यात फास्टट्रॅक न्यायालयांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अपेक्षित १३८ न्यायालयांपैकी केवळ सुमारे ४० कार्यरत असल्याचे सांगत उर्वरित न्यायालये तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नसरापूर प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून येत्या अधिवेशनातही हा मुद्दा ठामपणे मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

32 मिनिटे ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

39 मिनिटे ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

42 मिनिटे ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

5 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

6 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

6 तास ago