महाराष्ट्र

फेरीवाला प्रश्नावर उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

५ आठवड्यांत ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश

मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला कडक शब्दांत फटकारले असून, न्यायालयाने संरक्षित ९९ हजार फेरीवाल्यांना पाच आठवड्यांत ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीत “तीच तीच कारणे देताय, हे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी” अशी तीव्र टिप्पणी करत प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, २०१४ च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या सुमारे ९९ हजार फेरीवाल्यांची यादी प्रशासनाकडे असताना अद्याप त्यांना ओळखपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे वैध आणि अवैध फेरीवाल्यांमध्ये फरक करणे कठीण जात असल्याचा युक्तिवाद प्रशासनाकडून करण्यात आला. यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत, “यादी आहे तर उर्वरित अवैध फेरीवाल्यांवर कारवाई का केली नाही?” असा सवाल केला.

न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश देताना म्हटले की, आवश्यक असल्यास पालिकेला निधी, मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. तसेच ओळखपत्र वाटपानंतर बनावट कार्ड वापरणाऱ्यांवर २४ प्रभागांच्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी. नागरिकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक किंवा ई-मेल आयडी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मुंबईतील फेरीवाला झोनचा मुद्दा मात्र अद्याप रखडलेलाच आहे. २०१४ च्या पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक शहरात ‘हॉकिंग झोन’ आणि ‘नो-हॉकिंग झोन’ निश्चित करणे बंधनकारक होते. मुंबई महापालिकेने २०१६ ते २०१८ दरम्यान ८७९ फेरीवाला झोनचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र रहिवासी संघटनांचा विरोध, फेरीवाला संघटनांच्या याचिका आणि विविध न्यायालयीन प्रक्रियांमुळे हा विषय अद्याप अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेला नाही.

फेरीवाल्यांचा प्रश्न आता राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनला आहे. मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक फेरीवाले असल्याचा अंदाज असून, त्यापैकी फक्त ९९ हजार जणांनाच कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे कारवाई मोहिमा सुरू झाल्या की राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप वारंवार केला जातो.

दरम्यान, न्यायालयाने “बांगलादेशी फेरीवाल्यांवर काय कारवाई केली?” असा सवालही उपस्थित केला. मात्र बनावट आधार, रेशन कार्ड आणि इतर कागदपत्रांमुळे घुसखोर ओळखणे कठीण असल्याचे प्रशासनाने सांगितले. यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता पुढील पाच आठवड्यांत ९९ हजार संरक्षित फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे बंधनकारक झाले आहे. त्यानंतर अवैध फेरीवाल्यांवर कारवाई आणि कायमस्वरूपी फेरीवाला झोन निश्चित करण्याची प्रक्रिया गती घेण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घरगुती उपायांचे आरोग्यदायी फायदे आणि मर्यादा जाणून घ्या

आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा…

1 तास ago

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते या ५ सोप्या गोष्टी करा

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून…

1 तास ago

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध…

1 तास ago

वादळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्वजण सुखरूप

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण परिसरातील खराब हवामान आणि…

2 तास ago

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने…

2 तास ago

फडणवीसांच्या नव्या पुण्यात गुन्हेगारी वाढली; मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

पुण्यातील वाढत्या अत्याचार, ड्रग्ज, कोयता गँग आणि भूमिगत रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

2 तास ago