महाराष्ट्र

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

होमगार्ड जवानांनी सांगितले की, वर्षानुवर्षे सेवा देऊनही त्यांना कायमस्वरूपी काम दिले जात नाही. एक-दोन महिने ड्युटी दिल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांचा ब्रेक दिला जातो. विशेष म्हणजे केलेल्या कामाचा पगारही चार ते सहा महिने रखडत असल्याने जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीतही दरवर्षी नवीन भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने विद्यमान जवानांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या आंदोलनात होमगार्ड जवानांनी सहभागी होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. जालिंदर सुपेकर यांनी जारी केल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकामुळे होमगार्ड जवानांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात अडथळे निर्माण होत असल्याची टीका होत आहे.

यापूर्वी दैनिक द ग्लोबल टाइम्सच्या कार्यकारी संपादक व श्रमिक पत्रकार नेत्या शीतल हरीश करदेकर यांनी अग्रलेखातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रात सध्या ५५ हजारांहून अधिक होमगार्ड कार्यरत असून, पोलिसांप्रमाणेच जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची खंत जवानांनी व्यक्त केली आहे. आपत्ती, पूर, दुष्काळ, मोर्चे, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना वर्षभर रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

होमगार्ड जवानांच्या प्रमुख मागण्या

होमगार्ड कायद्यात तात्काळ दुरुस्ती करावी

वर्षभर (३६५ दिवस) कायमस्वरूपी काम द्यावे

सेवानिवृत्तीनंतर ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी

लोकहितेश निधीचा प्रश्न मार्गी लावावा

होमगार्ड कार्यालयातील वेतनी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी

विद्यमान समस्या सुटेपर्यंत नवीन भरती थांबवावी

निलंबित जवानांना पुन्हा सेवेत घ्यावे

पोलीस भरतीत वयोमर्यादा ३८ वर्षांपर्यंत वाढवावी

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घरगुती उपायांचे आरोग्यदायी फायदे आणि मर्यादा जाणून घ्या

आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा…

1 तास ago

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते या ५ सोप्या गोष्टी करा

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून…

1 तास ago

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध…

2 तास ago

वादळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्वजण सुखरूप

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण परिसरातील खराब हवामान आणि…

2 तास ago

फेरीवाला प्रश्नावर उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

५ आठवड्यांत ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने…

2 तास ago

फडणवीसांच्या नव्या पुण्यात गुन्हेगारी वाढली; मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

पुण्यातील वाढत्या अत्याचार, ड्रग्ज, कोयता गँग आणि भूमिगत रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

2 तास ago