महाराष्ट्र

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

होमगार्ड जवानांनी सांगितले की, वर्षानुवर्षे सेवा देऊनही त्यांना कायमस्वरूपी काम दिले जात नाही. एक-दोन महिने ड्युटी दिल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांचा ब्रेक दिला जातो. विशेष म्हणजे केलेल्या कामाचा पगारही चार ते सहा महिने रखडत असल्याने जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीतही दरवर्षी नवीन भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने विद्यमान जवानांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या आंदोलनात होमगार्ड जवानांनी सहभागी होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. जालिंदर सुपेकर यांनी जारी केल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकामुळे होमगार्ड जवानांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात अडथळे निर्माण होत असल्याची टीका होत आहे.

यापूर्वी दैनिक द ग्लोबल टाइम्सच्या कार्यकारी संपादक व श्रमिक पत्रकार नेत्या शीतल हरीश करदेकर यांनी अग्रलेखातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रात सध्या ५५ हजारांहून अधिक होमगार्ड कार्यरत असून, पोलिसांप्रमाणेच जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची खंत जवानांनी व्यक्त केली आहे. आपत्ती, पूर, दुष्काळ, मोर्चे, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना वर्षभर रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

होमगार्ड जवानांच्या प्रमुख मागण्या

होमगार्ड कायद्यात तात्काळ दुरुस्ती करावी

वर्षभर (३६५ दिवस) कायमस्वरूपी काम द्यावे

सेवानिवृत्तीनंतर ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी

लोकहितेश निधीचा प्रश्न मार्गी लावावा

होमगार्ड कार्यालयातील वेतनी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी

विद्यमान समस्या सुटेपर्यंत नवीन भरती थांबवावी

निलंबित जवानांना पुन्हा सेवेत घ्यावे

पोलीस भरतीत वयोमर्यादा ३८ वर्षांपर्यंत वाढवावी

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी…

9 तास ago

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

13 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

13 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

13 तास ago

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून…

13 तास ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

13 तास ago