महाराष्ट्र

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

होमगार्ड जवानांनी सांगितले की, वर्षानुवर्षे सेवा देऊनही त्यांना कायमस्वरूपी काम दिले जात नाही. एक-दोन महिने ड्युटी दिल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांचा ब्रेक दिला जातो. विशेष म्हणजे केलेल्या कामाचा पगारही चार ते सहा महिने रखडत असल्याने जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीतही दरवर्षी नवीन भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने विद्यमान जवानांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या आंदोलनात होमगार्ड जवानांनी सहभागी होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. जालिंदर सुपेकर यांनी जारी केल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकामुळे होमगार्ड जवानांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात अडथळे निर्माण होत असल्याची टीका होत आहे.

यापूर्वी दैनिक द ग्लोबल टाइम्सच्या कार्यकारी संपादक व श्रमिक पत्रकार नेत्या शीतल हरीश करदेकर यांनी अग्रलेखातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रात सध्या ५५ हजारांहून अधिक होमगार्ड कार्यरत असून, पोलिसांप्रमाणेच जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची खंत जवानांनी व्यक्त केली आहे. आपत्ती, पूर, दुष्काळ, मोर्चे, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना वर्षभर रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

होमगार्ड जवानांच्या प्रमुख मागण्या

होमगार्ड कायद्यात तात्काळ दुरुस्ती करावी

वर्षभर (३६५ दिवस) कायमस्वरूपी काम द्यावे

सेवानिवृत्तीनंतर ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी

लोकहितेश निधीचा प्रश्न मार्गी लावावा

होमगार्ड कार्यालयातील वेतनी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी

विद्यमान समस्या सुटेपर्यंत नवीन भरती थांबवावी

निलंबित जवानांना पुन्हा सेवेत घ्यावे

पोलीस भरतीत वयोमर्यादा ३८ वर्षांपर्यंत वाढवावी

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

2 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

2 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

2 तास ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

2 तास ago

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…

2 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये…

2 तास ago