CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे.
फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं जातं. जसं काही चांगलं झालं तर आईने केलं म्हणतात आणि काही वाईट झालं की बापावर फोडतात, तसंच हे झालं आहे. त्यामुळे आपण टीकांकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
तसेच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानत विधान परिषदेमध्ये दुसरी संधी दिल्याचंही स्पष्ट केलं. परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात फुके यांनी माफी मागावी, अन्यथा ‘शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ,’ असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
मात्र दुसरीकडे, शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संयम राखत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही. युतीचं सरकार आहे आणि आपण जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत, त्यामुळे वाद न वाढवता कामाची प्रसिद्धी द्या.’ या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजप युती सरकारमध्ये आतून कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे. राज्याच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा विधानांमुळे दोन्ही पक्षांत तणाव निर्माण होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. व्यवस्थापकीय कौशल्यामुळे वरिष्ठांचे कौतुक…
पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी…
पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…