सांगोला: सांगोला येथे जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते बोलताना म्हणाले, माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय? अस बोलत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट इशारा दिला आहे. मात्र बोलण्याच्या ओघात सदाभाऊ खोत यांच्याकडून अपशब्द वापरण्यात आले.
आजवर शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची विक्री केली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. असे असताना काही लोकं गाया अडवतात मी त्याला विरोध केला तर मला धमकीचे फोन येऊ लागले आहेत, मात्र माझ्या नादाला लागू नका मी सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे, तो नांगराचा फाळ तुमच्या xxxमध्ये घालीन, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाई बाजारामध्ये विकायला आणलेली नाही, हा हजारो वर्षांचा अतिहास आहे. मी तुम्हाला विचारतो कधी आपण देशी गाई बाजारात घेऊन आलो का? कधी खिलार गाय बाजारात आणली का? खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला लागलो, मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या xxx नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सांगोल्यामध्ये जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांचे नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत त्यांच्या शैलीत बोलले, मात्र हे बोलत असताना त्यांची जीभ घसरली.
गोरक्षक हेच मोठे दलाल झालेले आहेत. शेतकऱ्यांना अडवून गाई आणि जर्शी गाई गोशाळेत पाठवून दिल्या जातात. परंतु, गोशाळेत किती गाई आणि म्हशी गेल्या आहेत? त्यांची पुढे विल्हेवाट काय लावण्यात आली? त्या गाई किंवा म्हशी जिवंत आहेत का? म्हशी किंवा गाईंचा टेम्पो भरला की गोरक्षकवाले पुढील कार्यकर्त्याला फोन लावलात, तो पुढे फोन लावतो, एकजण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन करतो आणि सगळी मिळून टेम्पोवाल्याच्या मागे लागतात. तुम्हाला कामे धंदे आहेत की नाही? तुम्ही दहा वीस गाई पाळा, शेण काढा, व्यवसाय करा, बोक्यांनो…शेतकऱ्यांच्या जीवावर कुठे जगत आहात, अस बुधवारी नाशिक येथे सदाभाऊ खोत म्हणाले होते. यानंतर काल (गुरुवार) सांगोला येथे बोलताना त्यांची जीभ घसरल्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…