महाराष्ट्र

सरकारी कामासाठी कोणी लाच मागितल्यास येथे करा तक्रार

संभाजीनगर: जर तुमच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता किंवा लाच न देता तुम्ही थेट एसीबीकडे तक्रार करू शकता. एसीबी तुम्हाला पूर्ण सहकार्य करते आणि तुमची ओळख गुप्त ठेवते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार कशी करावी

टोल-फ्री क्रमांक

1064 – २४x७ उपलब्ध. कॉल करून तक्रार सविस्तर सांगा.

व्हॉट्सअँप क्रमांक

9930997700 – या क्रमांकावर मेसेज पाठवून तक्रार करा.

ऑडिओ/व्हिडिओ क्लिप्ससारखे पुरावे सुद्धा पाठवू शकता.

मोबाईल ॲप्लिकेशन

ACB Maharashtra – हे ॲप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे.यामध्ये तक्रार फॉर्म, पुरावे अपलोड सुविधा, आणि कार्यालयाची माहिती उपलब्ध आहे.

प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन 

जवळच्या ACB कार्यालयात जाऊन लेखी तक्रार द्या. अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील.

ई-मेलद्वारे तक्रार 

तुमच्या जिल्ह्याच्या ACB युनिटच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार सविस्तर लिहून पाठवा. (संपूर्ण यादी खाली वेबसाईटवर दिली आहे.)

अधिकृत वेबसाईट

https://www.acbmaharashtra.gom.in

छ. संभाजीनगर (औरंगाबाद) ACB संपर्क क्रमांक; 0240-2344050

तक्रार करताना ही माहिती द्यावी

नाव व संपर्क क्रमांक (गोपनीय ठेवले जाते)

अधिकाऱ्याचे नाव, पद व विभाग

कामाचे स्वरूप व लाच मागितलेली रक्कम

तारीख, वेळ व ठिकाण

पुरावे (ऑडिओ, व्हिडिओ, दस्तऐवज) – असल्यास जोडावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

1 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

1 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago