महाराष्ट्र

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव.

सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती झाली तर 100+ जागा सहज मिळू शकतील, असा या सर्व्हेचा अंदाज आहे.तर मनसेला स्वतंत्रपणे लढल्यास 25 जागा मिळण्याची शक्यता, परंतु युतीत मनसेला अधिक फायदा होणार.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्व्हेवरून तयार केलेल्या आकडेवारीनुसार, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप, शिंदे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित पूर्णपणे कोलमडू शकते.

याआधी काय घडलं होतं

2012 मध्ये एकसंध शिवसेनेला 75, भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये शिवसेना व भाजप वेगळे लढले, तेव्हा शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या. मनसे केवळ सात जागांवर सीमित राहिली होती.

मराठी मते आणि ठाकरे ब्रँडची ताकद

गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहीम, वांद्रे, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग या मराठी बहुल भागात ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा फरक पडणार आहे. युती न झाल्यास राज ठाकरे यांच्या मनसेला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागेल, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

भाजपची रणनीती स्पष्ट

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. यामुळे भाजप-शिंदे युतीने महापालिका ताब्यात घेण्याचा विश्वास बाळगला आहे.

राजकीय भविष्य

सर्व्हेचा निष्कर्ष स्पष्ट सांगतो; “ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पुन्हा त्यांच्याच ताब्यात येईल. पण जर ते वेगळे राहिले तर भाजपचा दणका अटळ आहे.” त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

15 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

16 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

1 दिवस ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

2 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

2 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

2 दिवस ago