महाराष्ट्र

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव.

सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती झाली तर 100+ जागा सहज मिळू शकतील, असा या सर्व्हेचा अंदाज आहे.तर मनसेला स्वतंत्रपणे लढल्यास 25 जागा मिळण्याची शक्यता, परंतु युतीत मनसेला अधिक फायदा होणार.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्व्हेवरून तयार केलेल्या आकडेवारीनुसार, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप, शिंदे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित पूर्णपणे कोलमडू शकते.

याआधी काय घडलं होतं

2012 मध्ये एकसंध शिवसेनेला 75, भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये शिवसेना व भाजप वेगळे लढले, तेव्हा शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या. मनसे केवळ सात जागांवर सीमित राहिली होती.

मराठी मते आणि ठाकरे ब्रँडची ताकद

गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहीम, वांद्रे, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग या मराठी बहुल भागात ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा फरक पडणार आहे. युती न झाल्यास राज ठाकरे यांच्या मनसेला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागेल, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

भाजपची रणनीती स्पष्ट

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. यामुळे भाजप-शिंदे युतीने महापालिका ताब्यात घेण्याचा विश्वास बाळगला आहे.

राजकीय भविष्य

सर्व्हेचा निष्कर्ष स्पष्ट सांगतो; “ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पुन्हा त्यांच्याच ताब्यात येईल. पण जर ते वेगळे राहिले तर भाजपचा दणका अटळ आहे.” त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

13 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

13 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

13 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

15 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago