महाराष्ट्र

मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ…

मुंबई: राज्यातील बालकलावंतांसह दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ रविवारी दि.५ – १० – २०२५ )रोजी श्री सत्यनारायण महापुजेने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात झालेल्या या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. महापुजेनंतर अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मध्यवर्ती कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ शेख अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, निमंत्रित कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, सीमा यलगुलवार, नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्यासह बृहन्मुंबई शाखा उपाध्यक्ष सुनील सागवेकर, कार्याधक्ष्य ज्योती निसळ, प्रमुख कार्यवाहक आसेफ शेख, कोषध्यक्ष यशोदा माळकर पदाधिकारी, सदस्य व नवी मुंबई शाखा उपाध्यक्ष बाळकृष्ण ओडेकर आणि प्रमुख कार्यवाह निखिल आवटे, पदाधिकारी व सदस्यांनी कार्यालयात प्रवेश करत, कार्यालयाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील मान्यवरांसह, रंगमंच बॅकस्टेज वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी,दै. द ग्लोबल टाइम्सच्या कार्यकारी संपादक, माईमीडिया संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर, ऑल द बेस्ट नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, दिग्दर्शक – अभिनेते प्रवीण अहिरे, आर्यन देसाई , फोटोग्राफर समीर देसाई यांनी बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात भेट दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

11 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

11 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

11 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago