महाराष्ट्र

खरात प्रकरणावर सरकार झोपेत? सपकाळांचा घणाघात

साताऱ्यातील प्रकारावरून लोकशाहीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. दिवाळीपासूनच खरातच्या गैरव्यवहारांची माहिती सरकारकडे होती, मग सहा महिने कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीला अधिक बळ द्यावे, टास्क फोर्स स्थापन करावी आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. सरकार जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सपकाळ यांनी या प्रकरणाला अंधश्रद्धेचे दुष्परिणाम मानत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा उल्लेख करत अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प पुन्हा दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला असला तरी इतर संबंधितांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील गोंधळावर बोलताना त्यांनी मंत्री शंभुराजे देसाई आणि मकरंद पाटील यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या प्रकारावरून सरकारवर निशाणा साधला. “राज्यात मंत्रीच मार खात असतील तर लोकशाही धोक्यात आहे,” अशी टीका त्यांनी केली. या घटनेतून ‘वोट चोरी’वर शिक्कामोर्तब झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

याशिवाय, आमदार संजय गायकवाड यांच्यावरही सपकाळ यांनी गंभीर आरोप करत विकासकामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. कंत्राटे, अवैध व्यवसाय आणि संपत्ती वाढ याबाबत पारदर्शकता ठेवावी, असे ते म्हणाले.एकूणच, भोंदूबाबा प्रकरणामुळे अंधश्रद्धा, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय जबाबदारी या मुद्द्यांवर राज्यात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

13 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

14 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

20 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago