महाराष्ट्र

दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे; सुनिल तटकरे

मुंबई: दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

दादांनी ज्या कठोर परिश्रमातून एनडीएसोबत जाण्याची क्षमता प्रखरतेने दाखवली होती…आत्मविश्वासाने दाखवली होती. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचे संघटन आम्हा सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन उभे केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा ७२ टक्के स्ट्राईक रेट राहिला होता. दादांच्या जाण्याने आमच्यावर जो प्रसंग आला आहे त्यात आम्ही हळवे झालो आहोत आमच्या मनातील संवेदना जागृत आहेत. दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक विषयांवर आम्ही बोललो आहोत त्यामुळेच दादांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली पुढे नेणे आम्हा सर्वांचे काम आहे. ते आम्ही नेटाने करु असे सुनिल तटकरे यांनी विरोधकांना खडसावून सांगितले आहे.

आमचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्षाची घटना आणि त्यातील कलमे याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती कागदपत्रांसह आपल्यासमोर ठेवली आहे त्यामुळे मला त्या विषयावर अधिक काही बोलायचे नाही. पण योग्यवेळी योग्य ते बोलेन असेही सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सुनेत्रावहिनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ आपणाला चिंता करण्याची गरज नाही असे माध्यम प्रतिनिधींना सुनिल तटकरे यांनी सुनावले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…

43 मिनिटे ago

चाकणच्या रस्त्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात; १६ ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील…

51 मिनिटे ago

‘आदिवासींच्या हक्काचा पैसा जातो कुठे?’; आश्रमशाळांच्या कारभारावर वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि…

55 मिनिटे ago

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

15 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

15 तास ago