मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. शुक्रे यांना पदाची शपथ दिली.
न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे.
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली.
न्या. सुनील शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी प्राप्त केली.
न्यायिक सेवेत त्यांनी कोल्हापूरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन येथील सहसंचालक आणि नागपूरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अशा विविध पदांवर काम केले. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला. २०१३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पदोन्नती झाली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या (MSBCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता त्यांच्यावर महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान…
अकाली दलासोबतची युती संपुष्टात; भाजपकडून सर्व ११७ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा पंजाब: पंजाबच्या राजकारणात मोठी…
पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले…
१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक,…
मुंबई : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा येथील वसतिगृहातील अस्वच्छता, दूषित पिण्याचे पाणी, बंद…
मुंबई: ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी…