मुंबई: निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी Mamata Banerjee यांनी मोठी घोषणा करत राज्यातील पुरोहित आणि मुअज्जिन यांना दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनात ५०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानंतर त्यांना आता दरमहा २,००० रुपये मानधन मिळणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, पुरोहित आणि मुअज्जिन हे समाजाच्या आध्यात्मिक तसेच सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या सेवेची दखल घेत राज्य सरकारने मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे ही घोषणा Election Commission of India कडून West Bengal, Tamil Nadu, Kerala, Assam आणि Puducherry या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधी करण्यात आली. या पाचही विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होणार असून एप्रिल-मे दरम्यान निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी २०२१ मध्ये या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या वेळी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे, तमिळनाडूचा १० मे, आसामचा २० मे आणि केरळचा २३ मे रोजी संपला होता. तर पुडुचेरी विधानसभेचा कार्यकाळ १५ जून रोजी संपणार आहे.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…