संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी.
हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई.
डीजेला फाटा: डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांना प्राधान्य.
प्री-वेडिंगला नकार: प्री-वेडिंग फोटोशूट बंद करावे, आणि केलेच तर जाहीर प्रदर्शन टाळावे.
कर्जावर लग्न नको: कर्ज काढून लग्नाचा खर्च टाळावा.
साधेपणाला महत्त्व: देखावा आणि अनावश्यक खर्च टाळावा.
एकत्रित कार्यक्रम: लग्न, साखरपुडा आणि हळदी समारंभ शक्यतो एकाच दिवशी आयोजित करावेत.
फेट्यांचा मान: केवळ वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत.
भेटवस्तू पर्याय: आहेरामध्ये भेटवस्तूंऐवजी पुस्तके, झाडांची रोपे किंवा रोख रक्कम द्यावी. मुलीच्या नावे एफडी करण्याचाही उत्तम पर्याय.
मोजके पदार्थ: जेवणात ५ पेक्षा जास्त पदार्थ नसावेत.
शिस्तप्रियता: नवरदेवापुढे मद्यपान करून नाचणाऱ्यांना आवर घालावा.
वर उचलण्यास मनाई: हार घालताना वराला उचलून घेण्याची प्रथा बंद करावी.
दशक्रिया विधी: दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करावा.
अंमलबजावणी आणि सन्मान
या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ११ जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, आचारसंहितेचे उत्कृष्ट पालन करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सामाजिक बदलासाठी पुढाकार
नगरमधील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे एन. बी. धुमाळ फाउंडेशनने आयोजित केलेल्या बैठकीत बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. तनपुरे महाराजांनी समाजाला अनिष्ट रूढी सोडून बदलासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी कीर्तनकार व प्रबोधनकारांनी या आचारसंहितेच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
शिवरायांच्या आरतीबद्दल भूमिका
या बैठकीत सी. ए. ज्ञानेश्वर काळे यांनी लग्न समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याची प्रथा बंद करण्याची मागणी केली. “शिवराय आपले दैवत आहेत, त्यांना देवत्व बहाल करू नये. त्यांचा पराक्रम प्रेरणादायी आहे, आरती करून काही वर्षांनी तो पुसला जाईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराजांची आरती कोणीही कुठेही लावू नये किंवा ऐकू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. ही आचारसंहिता मराठा समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…