मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने आणखी एका प्रवेश फेरीची घोषणा केली आहे. ही फेरी 16 जुलैपासून सुरू होणार असून, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 ते 18 जुलै सायंकाळी 6 या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-2 भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.
या फेरीचे प्रवेश वाटप 19 जुलै रोजी होणार असून, 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रवेश यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 20 ते 22 जुलै दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
यानंतर 23 जुलै रोजी माहिती प्रक्रिया पूर्ण होईल आणि 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…
मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…
62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल नवी…
दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय…
मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या…
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या…