महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेत 38% महिलांची फसवणूक; महायुती सरकारवर काँग्रेसचा गंभीर आरोप

62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, सरकारने विविध कारणे देत जवळपास 38 टक्के महिलांना योजनेतून वगळले असून 62 लाख महिलांना ई-केवायसी नसल्याचे कारण देत लाभापासून वंचित ठेवले आहे.

लोंढे पाटील यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा 1,500 रुपये आणि नंतर 2,100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र निवडणुका संपल्यानंतर लाभार्थी महिलांची नावेच कमी करण्यास सुरुवात झाली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 1 लाख 80 हजार महिलांना 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे कारण देत अपात्र ठरवण्यात आले, तर गरीब आणि अशिक्षित महिलांना ई-केवायसी व गुंतागुंतीच्या कॅप्चा प्रक्रियेमुळे योजनेपासून दूर ठेवण्यात आले.

काँग्रेसने योजनेच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या योजनेसाठी स्वतंत्र कार्यालय किंवा प्रभावी यंत्रणा नसल्याचा आरोप केला. तसेच कॅगच्या अहवालाचा हवाला देत मंजूर रकमेपेक्षा सुमारे 3,500 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

काँग्रेसने ई-केवायसीच्या कारणावरून वगळण्यात आलेल्या 62 लाख पात्र महिलांचे केवायसी प्रशासनाने पूर्ण करून त्यांना प्रलंबित रक्कमसह तात्काळ लाभ द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाह-शिंदे भेटीत विकासावर भर; शिवसेनेच्या ६ खासदारांच्या मतदारसंघांना केंद्राकडून गतीचे आश्वासन

नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

34 मिनिटे ago

राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…

54 मिनिटे ago

अकरावी प्रवेशाची नवी संधी; 16 जुलैपासून पुढील फेरी, सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश…

57 मिनिटे ago

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय…

1 तास ago

पशुसंवर्धन विभागाच्या बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्न; शंभरहुन अधिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘मॅट’ मध्ये धाव

मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या…

5 तास ago

वाघाच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांची वडेट्टीवारांकडून भेट; हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या…

5 तास ago