62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, सरकारने विविध कारणे देत जवळपास 38 टक्के महिलांना योजनेतून वगळले असून 62 लाख महिलांना ई-केवायसी नसल्याचे कारण देत लाभापासून वंचित ठेवले आहे.
लोंढे पाटील यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा 1,500 रुपये आणि नंतर 2,100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र निवडणुका संपल्यानंतर लाभार्थी महिलांची नावेच कमी करण्यास सुरुवात झाली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 1 लाख 80 हजार महिलांना 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे कारण देत अपात्र ठरवण्यात आले, तर गरीब आणि अशिक्षित महिलांना ई-केवायसी व गुंतागुंतीच्या कॅप्चा प्रक्रियेमुळे योजनेपासून दूर ठेवण्यात आले.
काँग्रेसने योजनेच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या योजनेसाठी स्वतंत्र कार्यालय किंवा प्रभावी यंत्रणा नसल्याचा आरोप केला. तसेच कॅगच्या अहवालाचा हवाला देत मंजूर रकमेपेक्षा सुमारे 3,500 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
काँग्रेसने ई-केवायसीच्या कारणावरून वगळण्यात आलेल्या 62 लाख पात्र महिलांचे केवायसी प्रशासनाने पूर्ण करून त्यांना प्रलंबित रक्कमसह तात्काळ लाभ द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते,…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती…
खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…
बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद,…
मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…
मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…