दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० फ्लेक्स हटवले आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले हे फलक वाहनचालकांची दृश्यमानता कमी करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढत होता.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत वाहतूक पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार मिलिंद देवरे आणि पोलीस अंमलदार लखन शिरसकर यांनी संयुक्तपणे सहभाग घेत महामार्गावरील सर्व अनधिकृत फलक हटवले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या फ्लेक्समुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत होते. तसेच रस्ता ओलांडणारे नागरिक, समोरून येणारी वाहने किंवा वळणावरील हालचाली वेळेत दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. त्यामुळे ही कारवाई रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.
यावेळी संबंधित व्यावसायिकांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, भविष्यात महामार्ग किंवा दुभाजकावर कोणतेही अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त करण्यास मोठी मदत होणार आहे.
“एक चुकीचा फ्लेक्सही जीवघेणा ठरू शकतो”
“महामार्गावरील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शिक्रापूर पोलीस, ग्रामपंचायत आणि पीएमआरडीएच्या सहकार्याने सातत्याने प्रयत्न करत आहेत. भविष्यात अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. फ्लेक्स लावण्यापूर्वी ग्रामपंचायत व पीएमआरडीएची आवश्यक परवानगी घेऊनच नियमांचे पालन करावे,” असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…
मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…
मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश…
62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल नवी…
मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या…
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या…