मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत राज्यातील ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही योजना ‘लाडकी बहीण’ नसून ‘फसवणूक बहीण’ योजना असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
मातेले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली आणि आता मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेतून वगळण्यात आले. सरकारकडे प्रसिद्धी आणि इव्हेंटसाठी निधी आहे; मात्र गरीब व कष्टकरी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची वेळ आली तेव्हा तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, महिलांना फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे करून नंतर लाखो अर्ज बाद करणे हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. महागाईच्या काळात महिलांना आर्थिक मदतीची आशा दाखवून ऐनवेळी ती हिरावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.महिला वर्ग हा अपमान विसरणार नाही आणि या कथित फसवणुकीचा हिशोब आगामी निवडणुकांमध्ये घेतला जाईल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
मुंबई: जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आपत्कालीन…
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक डॉ. सुकृत खांडेकर यांनी वयाची ७५ वर्षे…
पुणे: सासवड–जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे…
शिरुर (तेजस फडके): बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून सणसवाडी येथील एका २७ वर्षीय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील घोडे वस्ती नजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूमुखी पडल्याची…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…