मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत राज्यातील ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही योजना ‘लाडकी बहीण’ नसून ‘फसवणूक बहीण’ योजना असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
मातेले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली आणि आता मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेतून वगळण्यात आले. सरकारकडे प्रसिद्धी आणि इव्हेंटसाठी निधी आहे; मात्र गरीब व कष्टकरी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची वेळ आली तेव्हा तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, महिलांना फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे करून नंतर लाखो अर्ज बाद करणे हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. महागाईच्या काळात महिलांना आर्थिक मदतीची आशा दाखवून ऐनवेळी ती हिरावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.महिला वर्ग हा अपमान विसरणार नाही आणि या कथित फसवणुकीचा हिशोब आगामी निवडणुकांमध्ये घेतला जाईल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…
बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद,…
मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…
मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…
पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय…
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित होऊन १४ दिवस उलटले असतानाही अधिवेशनाच्या…