पुणे: सासवड–जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. तसेच जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत आणि आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांनी त्यांना धीर दिला.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांसह जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी पंढरपूरच्या वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच अपघातात जखमी झालेल्या भगिनी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी विठ्ठल चरणी प्रार्थनाही त्यांनी केली.
मुंबई: जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आपत्कालीन…
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक डॉ. सुकृत खांडेकर यांनी वयाची ७५ वर्षे…
मुंबई: 'लाडकी बहीण' योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत राज्यातील ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत…
शिरुर (तेजस फडके): बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून सणसवाडी येथील एका २७ वर्षीय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील घोडे वस्ती नजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूमुखी पडल्याची…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…