महाराष्ट्र

आता तलाठ्यांकडे जाण्याची कटकट संपली! जमिनीसंबंधित हे ११ कागदपत्रे घरबसल्या मिळणार

औरंगाबाद: शेतकरी आणि नागरिकांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. शासनाच्या ई-हक्क प्रणालीमुळे जमिनीशी संबंधित महत्त्वाचे ११ कागदपत्रे आता ऑनलाईन घरबसल्या मिळणार आहे.

ऑनलाईन ई-हक्क प्रणालीचे फायदे

या सुविधेमुळे नागरिकांना महा ई-सेवा केंद्राद्वारे किंवा स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज सादर करता येतात.

सात-बारा उताऱ्यातील फेरफार नोंदींचा कालावधी कमी करण्यासाठी या प्रणालीचा मोठा उपयोग होत आहे.

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी दिला जात आहे, ज्यामुळे वारंवार कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.

ई-हक्क पोर्टलवर उपलब्ध असलेल्या प्रमुख सेवा

या प्रणालीद्वारे तुम्ही खालील ११ प्रकारच्या नोंदींसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता

जमीन खरेदी-विक्रीची फेरफार नोंद करणे 

वारसाहक्काने नाव लावणे (वारस नोंद)

कौटुंबिक वाटणीची नोंद करणे

न्यायालयीन आदेशावरून सात-बारावर बदल करणे

जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी करणे

एकत्र कुटुंब नोंद कमी करणे

सात-बारावरील अपाक शेरा कमी करणे

इ-करार (E-Contract) नोंद करणे

विश्वस्ताचे (Trustee) नाव कमी करणे

नवीन बोजा चढविणे किंवा गहाणखताची नोंद करणे

संपत्तीचे हस्तांतरण आणि मृताचे नाव कमी करणे

या नवीन डिजिटल सुविधेमुळे सामान्य माणसाला सरकारी कार्यालयातील रांगांमधून मुक्ती मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

8 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

8 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

8 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

8 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago