महाराष्ट्र

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

औरंगाबाद: तुम्हाला आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. UIDAI ने नवीन नियम लागू केले असून आता आधार अपडेट प्रक्रिया आधीपेक्षा खूप सोपी झाली आहे.

आधार अपडेटसाठी UIDAI ची नवीन नियमावली

नवीन नियमानुसार आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव, जन्मतारीख किंवा पत्ता असेल तर ते आधार अपडेटसाठी पुरेसे ठरेल.

पूर्वी प्रत्येक माहिती साठी वेगळे दस्तऐवज द्यावे लागत होते, आता प्रक्रिया सोपी झाली आहे.

नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट – सर्वात विश्वसनीय दस्तावेज

पॅन कार्ड

मतदार ओळखपत्र

ड्रायव्हिंग लायसन्स

सरकारी ओळखपत्र

विवाह प्रमाणपत्र

पत्ता बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

पासपोर्ट

बँक पासबुक किंवा स्टेटमेंट

वीज, पाणी, गॅस बिले (3 महिन्यांच्या आत)

भाडेकरार + पोलीस पडताळणी / नोटरी प्रत

मतदार ओळखपत्र

रेशन कार्ड

हाऊस टॅक्स / प्रॉपर्टी टॅक्स पावती

जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जन्म प्रमाणपत्र

पासपोर्ट

दहावी / बारावीची मार्कशीट

फिजिकल पॅन कार्ड

कोणतेही सरकारी ओळखपत्र ज्यावर जन्मतारीख नमूद आहे

UIDAI ची नवी सुविधा – एकाच कागदपत्रावर संपूर्ण अपडेट

जर एका कागदपत्रात तुमचा फोटो + नाव + पत्ता किंवा जन्मतारीख असेल, तर तेच आधार अपडेटसाठी पुरेसे ठरेल. यामुळे नाव बदलणे, पत्ता अपडेट करणे, जन्मतारीख सुधारणे हे खूप सोपे झाले आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

दिलेली कागदपत्रे मूळ आणि स्पष्ट असावीत

खाडाखोड नसावी

माहिती बदलण्यास मर्यादा

नाव – 2 वेळा

जन्मतारीख – 1 वेळ

लिंग – 1 वेळ

अपडेट करण्यासाठी आधार केंद्र किंवा myAadhaar पोर्टल वापरा

दुरुस्ती झाल्यावर आधार पोस्टाद्वारे घरी येईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

3 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

16 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

22 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

22 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

22 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

23 तास ago