मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयावरूनही विरोधकांनी शंका उपस्थित केली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी, प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली, असा सवाल केला.
शेतकरी प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य
राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरूनही सरकारवर टीका करण्यात आली. जानेवारी महिन्यात मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत, बीड जिल्ह्यात सर्वाधिक २४ आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले. कर्जमाफी, पीकविमा आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईबाबत सरकारकडे ठोस धोरण नसल्याचा आरोप करण्यात आला. केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवूनही निधी मिळालेला नसल्याचेही विरोधकांनी नमूद केले.
एसीबी कारवाईवरून राजीनाम्याची मागणी
मंत्रालयातील कथित ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणात एसीबीने धाड टाकून मंत्री झिरवळ यांच्या पीएला अटक केल्याचा उल्लेख करत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. काही मंत्र्यांविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला. मुलुंड येथील मेट्रो स्लॅब दुर्घटनेचा उल्लेख करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
शक्तिपीठ महामार्गावरून वाद
काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावर आक्षेप घेत, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप केला. हा प्रकल्प कंत्राटदारांच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
महाविकास आघाडीची बैठक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…