महाराष्ट्र

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयावरूनही विरोधकांनी शंका उपस्थित केली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी, प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली, असा सवाल केला.

शेतकरी प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य

राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरूनही सरकारवर टीका करण्यात आली. जानेवारी महिन्यात मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत, बीड जिल्ह्यात सर्वाधिक २४ आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले. कर्जमाफी, पीकविमा आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईबाबत सरकारकडे ठोस धोरण नसल्याचा आरोप करण्यात आला. केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवूनही निधी मिळालेला नसल्याचेही विरोधकांनी नमूद केले.

एसीबी कारवाईवरून राजीनाम्याची मागणी

मंत्रालयातील कथित ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणात एसीबीने धाड टाकून मंत्री झिरवळ यांच्या पीएला अटक केल्याचा उल्लेख करत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. काही मंत्र्यांविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला. मुलुंड येथील मेट्रो स्लॅब दुर्घटनेचा उल्लेख करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

शक्तिपीठ महामार्गावरून वाद

काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावर आक्षेप घेत, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप केला. हा प्रकल्प कंत्राटदारांच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

महाविकास आघाडीची बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

57 सेकंद ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

4 मिनिटे ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

7 मिनिटे ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

10 मिनिटे ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

14 मिनिटे ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

17 मिनिटे ago