मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मराठी न येणाऱ्या अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी ‘व्यवहारिक मराठी’चे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषेचा सन्मान राखण्यासाठी अमराठी चालकांनी मराठी शिकणे आवश्यक आहे.
चालकांना प्राथमिक मराठी शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असून, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे सहकार्य मिळत आहे. रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही या उपक्रमात सहकार्याची तयारी दर्शविली आहे.
अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. मात्र, जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
यासंदर्भात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. तसेच चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’चा लघु अभ्यासक्रम तयार करून जनजागृती मोहीम राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील चालकांना मराठी भाषा अवगत करणे अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…