मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मराठी न येणाऱ्या अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी ‘व्यवहारिक मराठी’चे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषेचा सन्मान राखण्यासाठी अमराठी चालकांनी मराठी शिकणे आवश्यक आहे.
चालकांना प्राथमिक मराठी शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असून, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे सहकार्य मिळत आहे. रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही या उपक्रमात सहकार्याची तयारी दर्शविली आहे.
अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. मात्र, जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
यासंदर्भात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. तसेच चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’चा लघु अभ्यासक्रम तयार करून जनजागृती मोहीम राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील चालकांना मराठी भाषा अवगत करणे अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…