महाराष्ट्र

राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करणार; 2 ऑगस्ट रोजी ठाकरेंचा मार्गदर्शन मेळावा

मुंबई: महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

2 ऑगस्ट रोजी पनवेल येथे शेतकरी कामगार पक्ष 78 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज ठाकरे शेकापच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आगामी स्थानीक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत शेतकरी आणि कामगार यांची प्रमुख भूमिका असणार आहे. यामुळे शेतकरी आणि कामगारला एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोकण विभागात शेतकरी कामगार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सहित मनसे आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र येऊन कोकण काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. पनवेलमधील राज ठाकरे यांचा भाषण शेकापची नाराजी दूर करणार आहे, असा विश्वास मनसे नेत्यांनीव्यक्त केला आहे.

ठाकरे बंधूंची वज्रमूठ

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकसाठी दोन्ही बंधु एकत्र आले तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनाची अडचण वाढली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

18 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago