मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन वाचन करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सोनू शुक्ला, सुभाष पाखरे, दत्ता नांदे, नामदेव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. संविधान साकारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी कटीबद्ध असून लोकशाही व संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…