महाराष्ट्र

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी, असा ठाम दावा व्यक्त केला. आदित्य ठाकरेच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करून केलेल्या वक्तव्यावरून आपली भूमिका मवाळली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला.

मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, “मला याविषयी माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षातून कोणाला उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणणे हे आमच्या सर्वांचे काम आहे. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा करावी लागेल.”

आदित्य ठाकरेवर संजय राऊतांचे मत

आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी द्यावी, असे सांगितले होते. यावर संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितले आहे, त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे.”

चंद्रपूर महापौरपद गमावल्याबाबत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटामुळे महापौरपद गमावले असल्याचे वक्तव्य केले. यावर संजय राऊत यांनी सांगितले की, “तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले. आम्ही तुमच्या सोबत होतो. दिल्लीमध्ये उच्च पातळीवर बैठक झाली आणि दोन्ही गटांना समज देण्यात आले. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत, त्याचा परिणाम चंद्रपूरमधील राजकारणावर झाला.”

राहुल गांधीबाबत

भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी किंवा संजय राऊत यांनी काही विधानं केली तर सरकारचा अवमान होतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

6 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

14 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

23 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

23 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

23 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

24 तास ago