महाराष्ट्र

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी, असा ठाम दावा व्यक्त केला. आदित्य ठाकरेच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करून केलेल्या वक्तव्यावरून आपली भूमिका मवाळली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला.

मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, “मला याविषयी माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षातून कोणाला उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणणे हे आमच्या सर्वांचे काम आहे. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा करावी लागेल.”

आदित्य ठाकरेवर संजय राऊतांचे मत

आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी द्यावी, असे सांगितले होते. यावर संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितले आहे, त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे.”

चंद्रपूर महापौरपद गमावल्याबाबत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटामुळे महापौरपद गमावले असल्याचे वक्तव्य केले. यावर संजय राऊत यांनी सांगितले की, “तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले. आम्ही तुमच्या सोबत होतो. दिल्लीमध्ये उच्च पातळीवर बैठक झाली आणि दोन्ही गटांना समज देण्यात आले. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत, त्याचा परिणाम चंद्रपूरमधील राजकारणावर झाला.”

राहुल गांधीबाबत

भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी किंवा संजय राऊत यांनी काही विधानं केली तर सरकारचा अवमान होतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

1 मिनिट ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

45 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

48 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

55 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

60 मिनिटे ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

1 तास ago