मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी, असा ठाम दावा व्यक्त केला. आदित्य ठाकरेच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करून केलेल्या वक्तव्यावरून आपली भूमिका मवाळली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला.
मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, “मला याविषयी माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षातून कोणाला उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणणे हे आमच्या सर्वांचे काम आहे. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा करावी लागेल.”
आदित्य ठाकरेवर संजय राऊतांचे मत
आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी द्यावी, असे सांगितले होते. यावर संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितले आहे, त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे.”
चंद्रपूर महापौरपद गमावल्याबाबत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटामुळे महापौरपद गमावले असल्याचे वक्तव्य केले. यावर संजय राऊत यांनी सांगितले की, “तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले. आम्ही तुमच्या सोबत होतो. दिल्लीमध्ये उच्च पातळीवर बैठक झाली आणि दोन्ही गटांना समज देण्यात आले. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत, त्याचा परिणाम चंद्रपूरमधील राजकारणावर झाला.”
राहुल गांधीबाबत
भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी किंवा संजय राऊत यांनी काही विधानं केली तर सरकारचा अवमान होतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे.
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…