महाराष्ट्र

बारावी रसायनशास्त्र पेपर फुटीचा प्रकार; खासगी शिकवणीवर संशय, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने बुधवारी (ता. १८) घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ती एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रप्रमुखांच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर होण्यापूर्वीच संबंधित विद्यार्थिनीला ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेसाठी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षेपूर्वी एका वर्गात बसलेली विद्यार्थिनी प्रसाधनगृहात जात असल्याचे सांगून बाहेर गेली. बराच वेळ उलटल्यानंतरही ती परत न आल्याने पर्यवेक्षक शिक्षिकेला संशय आला. काही वेळाने ती परत आल्यानंतरही पेपरदरम्यान ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने तिच्या हालचाली अधिक संशयास्पद वाटल्या.

शिक्षिकेने तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळला. फोन सुरू करून पाहिल्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुपवर रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका शेअर झाल्याचे दिसून आले. तपासात ही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तिच्याकडे आल्याचे स्पष्ट झाले. संबंधित ग्रुपवर संभाव्य उत्तरांचाही आदानप्रदान झाल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती तत्काळ केंद्रप्रमुखांना देण्यात आली. त्यांनी मंडळाला कळवून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी विद्यार्थिनीची चौकशी केली असून तिच्या जबाबावरून आणखी एका विद्यार्थिनीची चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात एका खासगी शिकवणी वर्गाशी संबंधित व्यक्तीने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून मोबाईल आणि व्हॉट्सॲप ग्रुपमधील संदेशांचा तांत्रिक तपास सुरू आहे.

अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता

विद्यार्थिनी ज्या ग्रुपमध्ये सहभागी होती, त्यामधून ही प्रश्नपत्रिका शहरातील इतर विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नसून राज्यातील इतर भागांपर्यंत प्रश्नपत्रिका लीक झाली का, याचा सखोल तपास सुरू आहे.

प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, कोणत्या तांत्रिक माध्यमातून ती व्हायरल झाली आणि या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 दिवस ago