महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील भाकड जनावरांना घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पैसे वसूल करणारी टोळी सक्रीय

नागपूर: राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील भाकड जनावरांबाबत प्रश्न उपस्थित केले. गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते ऐकले नाही तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकऱ्याला इतकी मारहाण केली की त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकऱ्यांना काही पैसे तरी मिळतात. पण आता या बोगस टोळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे,ही वसुली थांबवली पाहिजे.

वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरफायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शेतकरी संघटनेकडून तक्रारी देखील आल्या आहेत. शेतकरी जनावरांची वाहतूक करताना अडवणूक झाली तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही, अस मंत्री म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

5 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

5 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

5 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

5 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

5 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

5 तास ago