महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील भाकड जनावरांना घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पैसे वसूल करणारी टोळी सक्रीय

नागपूर: राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील भाकड जनावरांबाबत प्रश्न उपस्थित केले. गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते ऐकले नाही तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकऱ्याला इतकी मारहाण केली की त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकऱ्यांना काही पैसे तरी मिळतात. पण आता या बोगस टोळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे,ही वसुली थांबवली पाहिजे.

वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरफायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शेतकरी संघटनेकडून तक्रारी देखील आल्या आहेत. शेतकरी जनावरांची वाहतूक करताना अडवणूक झाली तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही, अस मंत्री म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

7 मिनिटे ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

2 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

4 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

17 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

17 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

17 तास ago