महाराष्ट्र

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही…

औरंगाबाद: शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते, तर काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या होत्या मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे.

शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्याचे बंधन २०१३ पासून लागू करण्यात आले आहे. अनेकांनी नियुक्तीनंतर टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्षांची मुदत घेतली. त्यानुसार २०१९ पर्यंत ही मुदत असतानाही अनेकांना त्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होता आलेले नाही. मुदतवाढ घेऊनही टीईटी उत्तीर्ण न होता शासनाची पगार घेणाऱ्या शिक्षकांचा शोध घेतला जात असून जे शिक्षक आढळतील त्यांची सेवासमाप्ती केली जाणार आहे.

तत्पूर्वी, अशा शिक्षकांची नावे शिक्षण उपसंचालकांना पाठविली जाणार आहे. त्याठिकाणी सुनावणी होईल आणि सुनावणीअंती उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या शिक्षकांवर सेवासमाप्तीची कारवाई करतील.

शाळेने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांपैकी कोण टीईटी उत्तीर्ण नाहीत, याची माहिती मागविण्यात आली आहे. कोणत्याही शाळेने माहिती न लपविता वस्तुनिष्ठ माहिती देणे आवश्यक आहे.

टीईटी’ उत्तीर्णसाठी मुदतवाढ बंद

शासनाच्या २०२० मधील निर्णयानुसार अनुकंपा वगळता अन्य प्रवर्गातील शिक्षकांना (जे टीईटी उत्तीर्ण नाहीत असे) टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देणे बंद करण्यात आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांनाच तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसतानाही शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

11 मिनिटे ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

20 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

5 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

5 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

5 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

5 तास ago