महाराष्ट्र

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही…

औरंगाबाद: शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते, तर काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या होत्या मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे.

शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्याचे बंधन २०१३ पासून लागू करण्यात आले आहे. अनेकांनी नियुक्तीनंतर टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्षांची मुदत घेतली. त्यानुसार २०१९ पर्यंत ही मुदत असतानाही अनेकांना त्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होता आलेले नाही. मुदतवाढ घेऊनही टीईटी उत्तीर्ण न होता शासनाची पगार घेणाऱ्या शिक्षकांचा शोध घेतला जात असून जे शिक्षक आढळतील त्यांची सेवासमाप्ती केली जाणार आहे.

तत्पूर्वी, अशा शिक्षकांची नावे शिक्षण उपसंचालकांना पाठविली जाणार आहे. त्याठिकाणी सुनावणी होईल आणि सुनावणीअंती उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या शिक्षकांवर सेवासमाप्तीची कारवाई करतील.

शाळेने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांपैकी कोण टीईटी उत्तीर्ण नाहीत, याची माहिती मागविण्यात आली आहे. कोणत्याही शाळेने माहिती न लपविता वस्तुनिष्ठ माहिती देणे आवश्यक आहे.

टीईटी’ उत्तीर्णसाठी मुदतवाढ बंद

शासनाच्या २०२० मधील निर्णयानुसार अनुकंपा वगळता अन्य प्रवर्गातील शिक्षकांना (जे टीईटी उत्तीर्ण नाहीत असे) टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देणे बंद करण्यात आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांनाच तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसतानाही शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

20 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago