महाराष्ट्र

घरकुलसाठी आता मिळणार ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान, एकूण अनुदान २.०९ लाख रुपयांवर

संभाजीनगर: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.

आता कोणकोणते लाभ मिळणार

PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000

मनरेगामधून 90 दिवसांची मजुरी – ₹27,000

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी – ₹12,000

नवीन वाढीव अनुदान (राज्य शासनाकडून) – ₹50,000

एकूण मिळणारे अनुदान – ₹2,09,000

हा निर्णय का घेण्यात आला

सध्या घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य महाग झाले आहे, वाळूची टंचाई जाणवत आहे, आणि अनुदान अपुरे पडत होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली होती. आता सरकारने हे लक्षात घेऊन ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर केले आहे.

कोण लाभ घेऊ शकतो

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी

राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थी

अपूर्ण घरकुल बांधणारे लाभार्थी

नवीन पात्र अर्जदा

घरकुलांवर हरित व स्वच्छ वीजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढीव अनुदानातील ₹15,000 हे सौर यंत्रणा उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.

वाळूचा प्रश्न कधी सुटणार

घरकुलासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण अद्याप सुधारित धोरण स्पष्ट नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव रखडलेले आहेत. शासनाने कारवाईत जप्त केलेली व लिलावातील वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचे नियोजन केले आहे.

घाई करा, अंतिम मुदत जवळ आली आहे

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत १० एप्रिल २०२५ पर्यंत १.६० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तुमचेही घर यामध्ये असावे, यासाठी त्वरित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधा.

अर्ज व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील ग्रामसेवक, सरपंच किंवा पंचायत समिती कार्यालयात भेट द्या.

एक घर, एक स्वप्न – आता सरकारच्या मदतीने पूर्ण होईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

9 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

9 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

9 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

9 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

9 तास ago