ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, भविष्यातही त्याच उत्साहात सुरू राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथांच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल झाले आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेताना भाविक भावविवश होत असून, संपूर्ण परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त परिसर पूर्णतः भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून, भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वयोवृद्ध, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांना सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी सुरू केलेली ही सेवा आजही भक्त आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अखंडपणे सुरू असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर व सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, त्यावर लवकरच न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…