ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, भविष्यातही त्याच उत्साहात सुरू राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथांच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल झाले आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेताना भाविक भावविवश होत असून, संपूर्ण परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त परिसर पूर्णतः भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून, भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वयोवृद्ध, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांना सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी सुरू केलेली ही सेवा आजही भक्त आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अखंडपणे सुरू असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर व सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, त्यावर लवकरच न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…