महाराष्ट्र

मलंगगडावरील बांधकाम प्रकरणी लवकरच न्यायालयाचा निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, भविष्यातही त्याच उत्साहात सुरू राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले.

राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथांच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल झाले आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेताना भाविक भावविवश होत असून, संपूर्ण परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त परिसर पूर्णतः भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.

यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून, भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वयोवृद्ध, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांना सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी सुरू केलेली ही सेवा आजही भक्त आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अखंडपणे सुरू असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर व सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, त्यावर लवकरच न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

11 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

12 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

12 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

12 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

12 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

12 तास ago