मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजनही करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नाट्यगृह केवळ सांस्कृतिक वास्तू नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा करणारे आणि मराठी साहित्य, लोककला व संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
अण्णाभाऊ साठे यांनी गोरगरीब, कष्टकरी, दलित आणि वंचित समाजासाठी आयुष्य वेचले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या साहित्याने समाजातील वास्तव आणि संघर्षाला आवाज दिला, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.
यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव वाटेगाव येथे ५० कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच संशोधन केंद्र आणि नाट्यगृहाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
नूतनीकरणानंतर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झालेल्या नाट्यगृहातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळेल आणि मराठी रंगभूमीला नवी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापालिका प्रशासनाने हे नाट्यगृह सर्वसामान्य कलाकार व सांस्कृतिक संस्थांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार प्रकाश सुर्वे, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, भाई गिरकर, माजी आमदार सदा सरवणकर यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि अण्णाभाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…