महाराष्ट्र

आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हाधिकारी दाखवणार बाहेरचा रस्ता

औरंगाबाद: वृद्ध माता-पित्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांची आता खैर नाही. कारण आता जिल्हा प्रशासन अशा मुलांना चांगला धडा शिकवणार असून थेट जिल्हाधिकारीच त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवतील, इतकंच नव्हे तर, गरज पडल्यास त्यांचा पगारही थांबवला जाईल.

ज्येष्ठ माता-पित्यांना अखेर न्याय मिळणार जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणार मोठा दिलासा काय आहे ही योजना.

मुलांनी घराबाहेर काढल्यावर हक्काचं घर असूनही ज्येष्ठ नागरिक अनेक प्रश्न विचारतात – कोर्टात जावं कापण आता काळजी नको! ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा, २००७ नुसार जिल्हाधिकारी कार्यालय तुमच्या मदतीला धावून येणार आहे. या योजनेबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली महत्त्वाची माहिती. त्या म्हणाल्या, “ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा हा त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. ज्या मुलांना आई-वडिलांना त्रास देतात, त्यांना घरातून बाहेर काढतात किंवा कोणतीही मदत करत नाहीत, अशा मुलांविरुद्ध ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात. यानंतर त्यांना मदत केली जाते. यात मुलांना पोटगी देण्यास सांगितलं जातं, आणि जर घर आई-वडिलांच्या नावावर असेल, तर त्या मुलांना घराबाहेर काढून आई-वडिलांना त्यांचं घर परत मिळवून दिलं जात.

या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फक्त एका अर्जावर मदत मिळते, कोर्टाच्या कटकटीत पडायची गरज नाही

ज्योती कदम पुढे म्हणाल्या, “आजकाल अशी अनेक प्रकरणं येतात ज्यात पत्नीच्या सांगण्यावरून मुलं आपल्या आई-वडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर काढतात. पण कायद्यानुसार, आई-वडिलांच्या नावावर घर असताना मुलांना त्यांना बाहेर काढण्याचा कोणताही हक्क नाही. म्हणूनच, जे कोणी आपल्या वृद्ध आई-वडिलांना त्रास देत आहेत, त्यांना घराबाहेर काढण्याचा विचार करत आहेत, त्यांनी आता सावध राहा. जिल्हाधिकारी तुमच्यावर कारवाई करू शकतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

17 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

22 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

22 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

22 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

22 तास ago