महाराष्ट्र

सरकार म्हणतं ‘सगळं आलबेल’, पण गॅसचा प्रश्न अजूनही धगधगताच!

मुंबई: देशात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील शंका आणि भीती अजूनही कायम आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर परिणाम झाला असला, तरी भारतात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पेट्रोलियम सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी एलपीजी तुटवड्याच्या अफवा फेटाळून लावत, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारनेही राज्यात घरगुती गॅसचा पुरवठा पुरेसा असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

सरकारकडून रुग्णालये, वसतिगृहे आणि शालेय पोषण आहार योजनांसाठी गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले जात आहे. जिल्हास्तरावर मॉनिटरिंग समित्या स्थापन करून पुरवठ्यावर लक्ष ठेवले जात आहे. दररोज सुमारे २८ लाख सिलिंडर वितरण होत असून, ८७ टक्के बुकिंग डिजिटल माध्यमातून होत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी देशभरात सुमारे ६८ हजार छापे टाकण्यात आले असून, ८५५ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. ४८ हजारांहून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले, तर १४१ वितरकांवर कारवाई झाली असून काहींना निलंबितही करण्यात आले आहे.

तरीही वास्तव चित्र वेगळेच दिसत आहे. काही भागांत वाहनांसाठी लागणारा गॅस (सीएनजी) मिळण्यात अडचणी येत असल्याचे समोर येत आहे. दादर, प्रभादेवीसारख्या ठिकाणी काही गॅस पंप बंद असल्याने टॅक्सी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. “गॅस संपणार का?” या अफवांमुळे काही ठिकाणी घाईघाईने बुकिंग व साठेबाजीही होत असल्याचे दिसून येत आहे.सरकारकडून “सर्व काही सुरळीत” असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षातील अडचणी आणि नागरिकांचा अनुभव यामध्ये तफावत दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

3 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

3 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

11 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

11 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

11 तास ago