नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली.
सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभागृहात एकत्रितपणे निषेध नोंदवला. सीमावर्ती भागातील घुसखोरीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यास तसेच अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातील अटींबाबत माहिती देण्यास सरकार तयार नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण तापलं. “लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत खासदारांनी सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. घोषणाबाजीमुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झालं.
दरम्यान, सरकारकडून चर्चेला तयार असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात संसदेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…