नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली.
सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभागृहात एकत्रितपणे निषेध नोंदवला. सीमावर्ती भागातील घुसखोरीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यास तसेच अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातील अटींबाबत माहिती देण्यास सरकार तयार नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण तापलं. “लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत खासदारांनी सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. घोषणाबाजीमुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झालं.
दरम्यान, सरकारकडून चर्चेला तयार असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात संसदेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…