नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली.
सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभागृहात एकत्रितपणे निषेध नोंदवला. सीमावर्ती भागातील घुसखोरीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यास तसेच अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातील अटींबाबत माहिती देण्यास सरकार तयार नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण तापलं. “लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत खासदारांनी सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. घोषणाबाजीमुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झालं.
दरम्यान, सरकारकडून चर्चेला तयार असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात संसदेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…